Sunday, September 16, 2018

या चिमण्यांनो परत फिरा रे .......!



     एक सिंह आला अन दाणे टाकीत टाकीत गेलादाणे इतके गोड आमच्यासारखे आम्हीही ते दाणे टिपत टिपत त्याच्या मागावर गेलो.जो पर्यंत दाणे गोड लागत होते तो पर्यंत ठीक होते पण नंतर बदल होत गेलाअखेर त्याने दाणे टाकायचे बंद केल हे सांगायचे तात्पर्यम्हणजे ठिकठीकाणी विकासक नावाचा सिंह येतो अन भाडेकरूसारख्या सामान्यांना दाणे टाकून सावज टिपत असतो.  हा प्रकार सर्वत्रचालला आहे . सन २००७ साली पुनर्विकासासाठी बाहेर पडलेल्या जाफरभाई कानजी चाळीतील भाडेकरूविषयी सं घडले .  एकूण ८०पैकी   ते १०  रहिवाशी संत जनाबाई मंडईत स्थलांतरीत झाले तर  १० ते १२ रहिवासी मुंबई सेन्ट्रल येथे स्थलांतरीत झाले . उर्वरीतइकडे तिकडे घर भाड्याने घेऊन राहत आहेतस्थलांतरीत समस्यामुळे बदललेला समाज, बदललेले नाते या सर्व बाबींशी मिळतंजुळतंघेताना किती त्रागा करावा लागतोआज  वर्षे उलटून गेलीविकासक त्यांना झुलवितो आहेसुट्टीच्या दिवशी इमारतीचं काम  ही मंडळीकुठवर आले आहे हे पाहण्यासाठी धपापत्या उराने  येतात अन निराश चेहरा करून परत जातातघर भाडेकरूंच्या स्वप्नातले.....! स्वप्नातइतके रुतून बसले आहे की त्यांना प्रत्येक धक्का , प्रत्येक ठेच मनावर घाव करीत आहेत्यांच्या जखमांच्या गर्भात प्रतिशोध दडलेला नसो.जखम ठणकते आहे . यांच्या जखमेवर फुंकर घालणारी मायेची माणसं हवी आहेतमाणूस बऱ्याचदा  निराश होतोअपयशी झाला स्वत:च्या परिस्थितीला दोष देत असतो शिवाय   आपल्या मनातील स्वप्नांना..!          
                        बघता बघता आमची पिढी निवृत्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली. लहानपणापासून पाहत आलेलो घोडपदेवच्या जुनाट चाळी,चिंचोळ्या गल्ल्या, पडक्या झडक्या इमारती.  घोडपदेव विभाग अस्ताव्यस्त असलेला . सुधारणा होत गेल्याबैल तबेले होते तेथेमंडई आली.   काही ठिकाणी इमारती झाल्या. मांसमासोळी साठी आपल्या जवळ ठिकाण लाभल्यामुळे घोडपदेवकर विशेषतमहिला वर्गबेहद्द खुश झाला होतत्याही पेक्षा ज्यांनी पूर्वनियोजित कट आखून चलाखीने   गाळे घेतले होते ते तर शंभरपटीने मनातल्या मनात मांडेखात होतेपण ते क्षणिक होतेया मंडईला लागून जाफरभाई कानजी चाळ नावाची मराठी वस्तीएकूण ८० भाडेकरू असलेलीरस्त्यालालागून दुमजली माडी आणि दोन उभ्या रांगेतल्या चाळीरस्त्याला लागून वळणदार  दुकाने...  सुंदर चाळ होतीमाणसं चांगली होतीपणचाळ म्हातारी झाली होतीतिला नटवायचं... सजवायचं होते. त्यातून पुनर्विकास संकल्पनेचा जन्म झाला. अडसर आला तो दुरही झाला. तरीही मोठा अवधी गेला. म्हणता म्हणता ९ वर्षे झाली तरीही तपश्चर्या फळाला येत नाही. नियतीला दोष द्या नाहीतर अजून कश्याला. काही गोष्टी कुणाला जमत नसतील तर  त्यांनी इतरांकडे वर्ग करावयास हव्यात. यामागील कारण ज्यांचे  जोडे झीजताहेत त्यांना ठाऊकआहे संक्रमण शिबिर असो वा ती भाड्याची घरे. घुसमटलेले कोंडवाडे. यांना आवश्यक सोयीसुविधा नसतानाही सामंजस्याने घेताहेत म्हटल्यावर विकासकांनी समजून घ्यायला हवे होते. या भाडेकरुना घर बांधून देतो म्हणजे तो उपकारच करीत असल्याची भावनेची हवा त्याच्या डोक्यात घुसलेली आहे. भाडेकरूंच्या इमारतीबाजुला टोलेजंग टॉवर उभा आहे ना तो तेथील भाडेकरूंच्या जिवावर.... हे विकासकांनी लक्षात ठेवायला हवे.  संक्रमण शिबिरात राहणारे एक ठिकाणी वसलेले असले तरी भाडेतत्वावर राहणारे किमान ६० भाडेकरू दर अकरा महिन्यांनी खोल्या बदलताहेत. आजच्या काळात १२ ते १५ हजार घरभाडे सुरु असताना या विकासकाकडून तुटपुंज्या भाड्यावर समाधान  का मानायचे...? आता तर त्याने कहरच केला. घरभाडे देणेच बंद केले. व्यवस्था कमालीची खिळखिळी झाली असल्याने भाडेकरूंचे अस्तित्व क्षुल्लक झाले आहे. न्याय आहे त्या साठी कायदेशीर वाटा आहेत पण काही बाबतीत नाक दाबून... कपाली बुक्का लावण्याचा वापर करावा, ही राजकीय नीती आहे . भलेभले नेते याच मार्गाने मोठे झालेत. विकासक आणि तत्सम घरभाडेकरू यामध्ये सकारात्मक दृष्टीकोनाने निर्णय होत नाही तो  पर्यंत तरी आतुरतेने वाट पाहणारा भाडेकरू प्रतीक्षा करीत राहील.
                             जाफरभाई कानजी चाळीतील रहिवाश्यांसारखी अनेक ठिकाणी असं  घडतंय न्यायालयीन प्रक्रियेत गुरफटलेल्या भाडेकरूना.  १० ते १५  वर्षे उलटूनही आपल्या हक्काचं घर त्यांना मिळत नाही ही शोकांतिका कुणाला सांगायची......? भिकीबिडी चाळगेली आज तेच भाडेकरू  जेथे म्हाडाने वसविले तेथेच स्थायिक  झाले आहेतत्यांना परत यायचे नाहीअसं समजू यापण जाफरभाईकानजी चाळीतील   वर्ष जगण्याच्या संघर्षात गुंतलेल्या सामान्यांना आपले हक्काचं घर कधी मिळणार...?  चिमण्या आपल्या गावची वेसओलांडून गेल्या असल्या तरी ‘ या चिमण्यानोपरत फिरा रे......!’ अशी भावनिक साद कोणी घालील का ...?  त्यांच्याविषयी मायेचा ओलमनातून आपल्या खरोखर ओसरलेला आहे का....?  योगेश्वरचे रहिवाशी आले... श्रीकापरेश्वर कृपाचे रहिवासी आलेआपल्या हक्काच्याघरात राहत आहेत.आनंदी आहेतचाळ संस्कृती लोप पावली असली तरी हक्काच्या घरातील मजा आनदाने घेत आहेतजाफरभाई कानजीचाळीतील अनेक पार्थ असतील पण सारथ्य करणारांनी आपल्या रथात या चिमण्यांना लवकरात लवकर  आसरा द्यावाहे मनोमन वाटतआहे.
                                                                                                                                                                                       अशोक भेके

No comments:

Post a Comment